Friday 20 November 2015

विठ्ठल : महाराष्ट्राचे आराध्य दैवत Pandurang


विठ्ठल : महाराष्ट्राचे आराध्य दैवत

विष्णूशी संबंधित `एकादशी व्रतहे विठ्ठलाचे वारकरी निष्ठेने आचरित असतात.

तत्त्व:-
श्री विठ्ठलाचे तत्त्व तारक स्वरूपाचे आहे. त्यामुळेच श्री विठ्ठलाच्या हातांत कोणतेही शस्त्र नाही. श्री विठ्ठलाचे सर्व भक्तगण भोळा भाव असलेले आहेत. त्यामुळे श्री विठ्ठलाला `भक्ताचे रक्षण करणारी आराध्यदेवता', असे संबोधले जाते. संत तुकारामांच्या आळवण्याने श्री विठ्ठलाने शिवरायांचे रक्षण केले शत्रूपक्षाला त्या प्रसंगातून अप्रत्यक्षरीत्या त्रास दिला. श्री विठ्ठल प्रत्यक्ष कोणत्याही जिवाचा संहार करत नाही. हे त्याचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे.

`पांडुरंगया नामाचे वैशिष्ट्य:-
श्री विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार आहे. त्यामुळे दह्या-दुधाने माखल्या गेलेल्या रूपातच श्रीकृष्णाने श्री विठ्ठलाचे रूप धारण केले. त्यामुळे शास्त्रांत पुराणांत पांडुरंगाचा रंग सावळा सांगितलेला असलातरी अभिषेकाने तो पांढरा झाल्याने श्री विठ्ठलाला `पांडुरंगम्हणतात.

श्री विठ्ठलाला तुळस वाहण्याची वेगळी वैशिष्ट्ये:-तुळस श्रीलक्ष्मीचे प्रतीक आहे श्रीलक्ष्मी ही श्रीविष्णूची पत्नी असल्यामुळे (श्री विठ्ठल हा श्रीविष्णूचे रूप आहे.) ती तुळशीच्या माध्यमातून श्रीहरी चरणी रहाते.


भक्ताच्या हाकेला लगेच `देणारी देवता:-
श्री विठ्ठल भक्ताच्या हाकेला लगेच `देणारी देवता असल्याने ती पुरुष देवता असूनही त्याला भक्तगण `विठूमाऊलीया नावाने संबोधतात. श्री विठ्ठल खूप मायाळू प्रेमळ अंत:करणाचा असल्याने `तो भक्तांसाठी धावत येणारच आहे', असा भक्तांचा ठाम विश्वास असतो. त्याच दृढ भावापोटी विठूमाऊलीने भक्तांची दळणे दळलीगोवर्या थापल्या भक्ताची सेवा केली.

मूर्तीविज्ञान:-
काळया रंगाचीबटबटीत डोळयांचीदोन्ही हात कमरेवर ठेवलेली विटेवर उभीअशी विठ्ठलाची मूर्ति असते. पुंडलिकाने केलेल्या आईवडिलांच्या सेवेने प्रसन्न होऊन विठ्ठल त्याला दर्शन द्यायला आला. त्या वेळी पुंडलिकाने विठ्ठलाकडे वीट फेकून तिच्यावर त्याला उभे रहायला सांगितलेकारण त्याला आईवडिलांच्या सेवेत खंड पडू द्यायचा नव्हता. त्याच्या सेवेकडे कौतुकाने पहात विठ्ठल उभा राहिला. इतर देवांच्या मूर्तींत हातात शस्त्र असते किंवा एखादा हात आशीर्वाद देणारा असतो. तसे या मूर्तीत नाही. काही करता सर्वत्र साक्षिभावाने पहाणारा विठ्ठल त्यात दाखविला आहे. कमरेच्या वर ज्ञानेंद्रिये आहेततर खाली कर्मेंद्रिये आहेत. कमरेवर हात ठेवलेला म्हणजे कर्मेंद्रिये ताब्यात असलेला.

पंढपूरची वारी:-
आषाढी एकादशीचे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून करतात. आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. या एकादशीनिमित्त वारकर्यांकडून पंढरपूरची वारी केली जाते. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायात केली जाणारी पंढपूरची वारी हादेखील एक साधनामार्गच आहे. या संप्रदायात वार्षिकसहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेलतशी वारी करतात. ही कर्मकांडातील साधना आहे. वारीचे वारकरी देहाची पर्वा करता मैलोन्मैल चालतात. असे केल्याने शारीरिक तप घडतेम्हणजेच हठयोग होतो. मुळात वारकरी संप्रदायाची साधना ही भक्तियोगानुसार केली जाणारी साधना आहे. वारीच्या वेळी केले जाणारे भजन-कीर्तननामस्मरण यात भक्तियोग नामसंकीर्तनयोग यांचा सहज मिलाप झालेला दिसतो.

No comments:

Post a Comment